Pages

Friday, September 2, 2011

काळ लोटला, अवशेष राहिले, लंगोटी बहाद्दर राजकारणामुळे नळदुर्गचा विकास लांबला?


स्पर्धेच्या वाढत्या युगात शहरीकरणानेही प्रचंड वेग घेतला आहे. ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना पोहचत असतानाच नव्या तंत्रज्ञानाचाही मोठा प्रसार झाल्याचे सार्वधिक चित्र आहे. मात्र या विकासाच्या वेगात सध्या तुळजापूर तालुक्याअंतर्गत असलेले नळदुर्ग हे गाव मागे पडले आहे. एकेकाळी तालुका आणि जिल्हा म्हणून नावाजलेले व निजाम राजवटीत प्रसिद्ध बाजारपेठ असलेले नळदुर्गची आता जिल्हा तालुका नव्हे चक्क खेडयात गणना होऊ लागली आहे. ऐतिहासिक वारसा सांगणा-या नळदुर्गच्या अधोगतीलालंगोटी बहाद्दर राजकारणीचजबाबदार असल्याची खंतसर्वसामान्यांतुनव्यक्त होत आहे.
नळदुर्गचा सुप्रसिद्ध किल्ला, जुनी ऐतिहासिक मात्र नामशेष होत असलेली बाजार मैदान, जुन्या गढी, वाडे आणि इतिहासाचे साक्षीदार असलेल्या अनेक वास्तू या तत्कालीन ऐतिहासिक वैभवाच्या साक्ष आहेत. जिल्हयाचे न्यायालय, विभागीय कार्यालय असलेल्या नळदुर्गच्या न्यायालयीन निकालाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी, निर्णय अविस स्मरणात राहणारे आहेत. उस्मानाबाद येथे न्यायालयात कार्यरत कर्मचा-यांजवळ नळदुर्ग उर्दू भाषेत लिहिलेले ‘जिल्हे नळदुर्ग’ हे इतिहास कालीन किल्लीवरील निशान आजही पुराव्याची नोंद म्हणून दृष्टीस पडते.
नळदुर्ग येथे एकेकाळी विभागीय कार्यालय होते. इ.स. १९४० पर्यंत नळदुर्ग हे जिल्हयाचे केंद्र होते. त्यानंतर १९०९ सालापर्यंत याठिकाणी तालुक्यांचे केंद्र होते. उस्मानाबाद जिल्हयातील कांही विभागाचे काम येथे चालत असे इतिहास पे्रमी प्रसिद्धस्थानाचेे महत्त्व कमी होवू नये म्हणून निजामाने खास ङ्गर्मान काढून तुळजापूर तालुक्याचे मुन्सङ्ग कोर्ट याठिकाणी ठेवले. ते १९०९ पासून १९५१ सालापर्यंत नळदुर्ग येथेचे होते.
मात्र आज नळदुर्ग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित आहे. नळदुर्ग तालुका करावा हि मागणी ङ्गार जुनी असून वेळेावेळी पाठपुरावा जनेतेने केलेला आहे. शहरात व्यापारी बाजारपेठ आजतागायत म्हणावी तशी विकसित झाली नाही. सामान्य नागरीकांना आवश्यक त्या वस्तु मिळत नाहीत. त्याकरिता सोलापूर, उस्मानाबाद, लातूर बाजारपेठांकडे धाव घ्यावी लागते. परिसरातील शेतकरी वर्गाची मोठया प्रमाणात पिळवणूक होत असून नळदुर्ग येथील माकेर्र्ट यार्डची उभारणी व्हावी अशी मागणी होत आहे. ठोक बाजारपेठेची सोय नसल्यामुळे अनेक शेतक-यांना आपला माल कमी किंमतीत स्थानिक आडतीमध्ये विकावा लागतो. दुसरीकडे सोलापूर सारख्या बाजारपेठेत शेतीमाल न्यावयाचा असल्यास ते ने - आण करण्याचा वाहतूक खर्च भुर्दंड म्हणून शेतक-यांना सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागत नाही. नळदुर्ग परिसरातील जवळपास शंभर खेडेगावातल्या शेतक-यांना त्यांच्या शेतीमालास योग्य मोबदला मिळवून देण्याकरिता मोठया बाजार मार्केटची सोय होणे गरजेचे आहे.
नळदुर्ग आठवडी बाजार गेल्या ४० वर्षापासून किल्ला गेट ते चावडी चौक, शास्त्रीचौक या शहराच्या अरूंद मुख्य रस्त्याच्या दरम्यान भरविला जातो. भाजीपाला, ङ्गळे, धान्य, कापड, तेल, स्टेशनरी, चर्मकार, मिरची, हॉटेल, मासे आदी विक्रेत्यांची गर्दी दर आठवडयाला होते. या आठवडी बाजारात ङ्गळ विक्रेते ङ्गळगाडया आडव्या-तिडव्या लावतात. त्याचा त्रास बाजारातील नागरिकांना व व्यापा-यांना होतो. या ठिकाणी भरणा-या आठवडी बाजाराचे हुतात्मा स्मारक, नगरपालिका कार्यालय, बसस्थानक रोड, हनुमान चौक या दरम्यानच्या चौक रस्त्यावर प्रशस्तपणे व मध्यवर्ती ठिकाणी बाजार भरू शकतो. या दृष्टीने बाजाराचे स्थलांतर होणे गरजेचे आहे. निजाम राजवटीत सर्व सामन्यांना मिळणा-याही सुविधा सध्याचे प्रशासन देऊ शकत नाही. शहरातील केर, कचरा, खत उचलण्याकरिता ट्रॅक्टरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रूग्णवाहिका आवश्यक आहे. शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी रूग्णांना प्राथमिक सुविधा नाहीत. जि.प. आरोग्य विभागामार्ङ्गत याठिकाणी औषधांचा अपूरा पुरवठा होत आहे. त्यामुळे गरीब जनतेला काही आवश्यक औषधे स्वत:च्या पैशाने खरेदी करावी लागतात. त्यामुळे याठिकाणी ग्रामीण रूग्णालय मंजूर झाले आहे. मात्र त्याच्या भूमीपूजनचे मूर्हूत अद्याप प्रशासनाला सापडले नाही. स्वतंत्र उत्तर काळानंतर शहराचा विकास होण्याऐवजी त्यांचा दर्जा घसरत चालल्याने निजाम राजवट बरी म्हणण्याची वेळ शहरासह परिसरातील गावाच्या नागरिकांवर आली आहे.

No comments:

Post a Comment