Pages

Friday, August 26, 2011

लंगोटी बहाद्दर राजकारणी चढत नाहीत बालाघाटचा डोंगर


नळदुर्गचे लंगोटी बहाद्दर राजकारणी कधीही बालाघाटचा डोंगर चढून वर जात नाहीत, याचे विवेचन करताना एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षक सतत उदाहरण देतात की, ‘नळदुर्गकरांना शाप आहे’. येथे किल्ला असल्याने लढाया झाल्या, परंतु या गडावर एकाही राज्याने किंवा महाराजाची, आदिलशहाची किंवा सुलतानाची एकछत्री सत्ता अबाधित कधीच राहीली नाही, त्यामुळे नळदुर्ग शापित आहे. येथिल खेकड्याचे राजकारण करणारे राजकारणी कधी एकमेकांचे पाय ओढतील ते सांगता येत नाही. त्यातले त्यात ङ्गक्त नगरपालिका पुरतीच यांची राजकीय अभिलाशा असते, राजकारणातयायचे तर नगरपालिका लुटायचे हेचयांचे ध्येय ठरलेले आहे. ‘जसे पाण्यात पडलेल्या बेडकास आपण या पृथ्वीतलावरील सर्वांत मोठे प्राणीअसल्याचेवाटते.’ तसेच या लंगोटी बहाद्दर राजकारण्यांचे आहे. म्हणुनच हे मिंधे आहेत व शेजार्‍यासमोर ताठ मानेने उभे राहू शकत नाही. ङ्गक्त हुजरे गिरी करणे, हे यांच्या रक्तातच भिनले आहे. म्हणुन यांची इच्छाशक्ती कमजोर झाली आहे.

नेतृत्वा अभावी विकास खुंटला

इतिहास असे सांगतो की, नळदुर्ग हे ‘नळ’ उर्फ ‘नल’ राजाची राजधानीयेथे,अनेक राजवटीनी सत्ता गाजवली. तसेच चालुक्य, बहामनी, आदिलशाही व निजामशाहीतही हे राजधानीच राहिली. निजामाच्या उतरत्या काळी त्याचा सेनापती उस्मानअलीने या नळदुर्ग वर गडांतर आणुन याचे सर्व हक्क तत्कालीन ‘धाराशिव’ सध्याचे उस्मानाबाद शहरास हलविले. तेंव्हापासुन या शहराची अधोगतीच सुरू झाली आहे. आज तालुक्याचे ठिकाण असुनही योग्य नेतृत्व व नेतृत्वाचा अभाव असल्याने सतत आण्णाकडे तालुका करा म्हणुन भिक मागावी लागते. पण नळदुर्ग तालुका केल्यास आपल्या हातुन सत्ता जाईल या भितीने नळदुर्गकरांना ‘तालुक्यासाठी’ सतत झुलवित ठेवले जात आहे. या गावचे लंगोटी बहाद्दर मुजरे व हुजरे राजकारणी ङ्गक्त तालुक्याच्या मार्गावर नंदीबैलाचे काम करताना दिसतात. एकाही पक्षाने किंवा राजकीय पुढार्‍यांने जनतेच्या पाठींब्याने तालुक्याची मागणी पुढे रेटली नाही व कधी आंदोलन केेले नाही. १९९२ मध्ये जेंव्हा राज्यातील शिवशाही युती सरकारने नवीन तालुके निर्माण केले, तेंव्हा त्यांनी स्व आमदार तिथे तालुका म्हणत उमरगा तालुक्यातील लोहारा या गावास तालुक्याचा दर्जा दिला व नळदुर्गला जाणुन बुजून तालुका करण्याचे टाळले. ही बातमी जेंव्हा शहरास कळाली तेंव्हाही काँग्रेस आय व राष्ट्रवादी कॉंग्रेसचेलंगोटी बहाद्दर थंडच राहिले. जनता स्वयंस्ङ्गुर्तीने रस्त्यावर उतरली. तेंव्हा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे दिवंगत कार्यकर्ते विरेशप्पा डोंबे व काशिनाथ घोडके यांनी नेतृत्व केले. त्यांनाही राजकीय नेत्यांनी खांबिर साथ तेंव्हा दिली नाही. तर यावर कसे आपले राजकारण भाजून घेता येईल, ते पाहतआण्णांनी आम्हा नळदुर्गकरांना झुलवत ठेवले व आजही झुलवतच आहेत. आज एकही बहाद्दरआण्णांना तालुका का केला नाही म्हणुन जाब विचारीत नाहीत व विचारण्याची त्यांची पात्रताच राहिली नाही. कारण नगरपालिके पुरत्या व विविध कार्यकारी सोसायटी पुरत्याच इच्छाकांक्षा त्यांच्या सिमित झाल्या आहेत. मिळेल त्यावर तंगडी ओढून ओढून खाण्यावर ठेवून यांना मिंधे व लाचार करून टाकले आहे. यामुळे इथे कधी नेतृत्व तयार होते व होईल याची अपेक्षाही ठेवणे चुकीचे आहे.

सुधीर पोतदार
नळदुर्ग

No comments:

Post a Comment