Pages

Monday, August 8, 2011

लंगोटी बहाद्दराचे राजकारण

नळदुर्गचे राजकारण म्हणजे लंगोटी बहाद्दराचे राजकारण झाले असुन या राजकारणाला समाजसेवेचा गंध नाही, की राजकारणी व्यक्तीना समाजकारण करायला आवडत नाही, हे अजुनही नळदुर्गकरांना उमजले नाही. यामुळेच नळदुर्गच्या राजकारणाला लंगोटी बहाद्दराचे राजकारण म्हणावेसे वाटते.
सध्या तर डिजिटल युगात कार्यकर्तेही डिजिटल झालेत. शेबंडया पोरानाही राजकारणाचे वेध लागले आहे. मोठ-मोठे होर्डिग लावुन पाच पोरं मागं असलं म्हणजे दादा झाल्यासारखे वाटत आहे. काय झालय या गावाला, जरा विचार करण्यास कोणास वेळ तरी मिळतोय काय? हे गाव असेच भरकटले जाणार, या गावास आजपर्यंत ना नेतृत्व मिळाले, ना कोणी नेतृत्व केले.‘‘ नावाड्याविना भरकटलेल्या समुद्रात नावाडी जसा वलव्हतो’’ तसं हे गाव चालला आहे. एक काळ आला होता, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे नेतृत्व करणारे व्यंकटराव काका नळदुर्गकर यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आल्यानंतर नळदुर्गवर अन्याय होणार नाही असे वाटायचे. पण नेत्यांनीच गाव सोडून जन्मभूमीकरांना पोरके केले. तेव्हापासून येथे ना नेतृत्व घडले, ना नेतृत्व तयार झाले ही नळदुर्गकरांची खरी शोकांतिका आहे. जाणकार राजकारणी म्हणतात की, गावचे राजकारण व राजकारणी सोसायटीच्या राजकारणापुढे जाऊ शकत नाही. ते आजघडीलाही खरे ठरत आहे.
‘संधी आली होती पण वेळ आली नव्हती’ असे म्हणतात हे नळदुर्गकरांना आजही भोगावे लागत आहे. नळदुर्गच्या राजकारणात व्यंकटराव काका नळदुर्गकर यांच्या नंतर भास्करराव मोहरीर, सुधीर जगदाळे, काशिनाथ घोडके यांना तुळजापूर तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. परंतु शेजारी शिजलेल्या कुटिल डावामुळे नेतृत्वही पुढे येऊ शकले नाही. त्यानंतर आजही नळदुर्ग शहरवाशी प्रत्येक गोष्टीसाठी झगडताना दिसत आहे व शेजारी मात्र उड्या मारताना दिसतात. कधी समजणार या नळदुर्गकरांना, का अजुनही हे भरकटत राहणार. बसं झालं आज एवढ्यावरच थांबू. उद्या आपणाशी आणखी काही सांगायचे आहे.

No comments:

Post a Comment