Pages

Monday, August 8, 2011

नळदुर्ग जि.प. केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांची हेळसांड

नळदुर्ग (शिवाजी नाईक) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. अपुरे वर्ग व वर्गात भरगच्च शैक्षणिक साहित्याचा भडीमार व घाणीच्या साम्राज्यामुळे विद्यार्थ्यांना नाहकच नरक यातना सोसाव्या लागत आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याकडेे त्वरित गांभिर्याने लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी पालकांतुन केली जात आहे.
नळदुर्ग येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग भरविले जात असुने याच ठिकाणी उर्दु माध्यमाची इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असे मिळुन मराठी व उर्दु माध्यमचे वर्ग नऊ खोल्यामधुन भरविले जात आहे. मराठी शाळेला सुसज्ज इमारत असताना जिल्हा परिषदेने येथे दोन-दोन शाळा एकत्र भरविण्यास परवानगी देवून उर्दू माध्यमांची शाळा गेल्या काही वर्षांपासुन सुरू केल्याने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे. एका वर्गात दोन-दोन वर्गाचे शिक्षण देण्याचे कार्य येथील शिक्षक पार पाडीत आहेत. मराठी माध्यमाबरोबर उर्दूचा कलकलाट व गोंधळात विद्यार्थी काय शिकतात ते देवच जाणो, उर्दू शाळेला दुसरीकडे इमारत बांधुन तेथे शाळा भरवावी व विद्यार्थ्यांची यातुन सुटका करावी. वर्ग एकीकडे कमी असताना जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाने केंद्रिय प्राथमिक शाळेंतर्गत असलेल्या परिसरातील १८ शाळेला वाटप करण्याकरिता शैक्षणिक साहित्याचा भडिमार एकदाच केला आहे. हे शैक्षणिक साहित्य वर्गामध्ये ठेवण्यात आल्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने दाटीवाटीने बालकांना धडा गिरवावा लागत आहे. या शाळेत १ ते ५ वर्गाच्या अध्ययनाकरिता ८ शिक्षक नियुक्त केले आहे. यामध्ये पती पत्नी शिक्षक एकाच ठिकाणी नोकरीस असतील तर त्यांना एकत्र शाळेत नोकरीस घेण्याचा शासकीय नियम असल्याने या शाळेचे मुख्याध्यापक सदर नियमाचा पुरेपुर ङ्गायदा उचलत असुन नोकरीच्या ठिकाणी निवासी राहण्याकरिता शासन घरभाडे भत्ता देत असताना हे महाशय मात्र आपले पाल्य उस्मानाबाद येथील एका नामांकित खासगी संस्थेत घातले असल्याने ते उस्मानाबाद मध्येच जावून राहिले आहे व दररोज उस्मानाबाद ते नळदुर्ग ५२ कि.मी. चे अंतर पार करून पती-पत्नी शिक्षक शाळेची वेळ निघुन गेल्यानंतर दुपारी कामावर हजर राहत असून शासनाची ङ्गसवणुक करीत आहेत. मुख्याध्यापकच शाळेत उशिरा येत असल्याने काही शिक्षक वगळता अनेक शिक्षक प्रार्थनेस उपस्थित न राहता वाटेल तेव्हा शाळेत येवून वेळेपुर्वी शाळेत आल्याची रजिस्टरला तशी नोंद करून स्वाक्षरी करीत असल्याचा घृणास्पद प्रकार खुलेआम घडत आहे. दरवेळी उशिरा येण्याचे कारण या शिक्षक दाम्पत्यास विचारले असता, दररोज प्रशासकीय कामामुळेच आपणास उशिर होतो, असे सांगतात. यामुळे पालकांत संताप व्यक्त केला जात असुन या शाळेला सतत दांडी मारून इतर उद्योगात मशगुल असणार्‍या शिक्षकांची त्वरित बदली न केल्यास पालकांतुन शाळेला कुलूप घालण्याचा इशारा दिला जात आहे. दरम्यान, शिक्षकांच्या मनमानी कारभाराचा सर्वाधिक ङ्गटका विद्यार्थ्यांना बसून शैक्षणिक वातावरण मात्र गढुळ होत आहे. या शाळेची चौकशी शिक्षणाधिकारी यांनी स्वत: करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांतुन होत आहे.

No comments:

Post a Comment